July 6, 2011

मी कोण ?

सगळ्यांना मोठा प्रश्न पडला असेल ना कि ब्लॉग तर आहे पण ब्लॉग लिहिणाऱ्याचे नाव काय ?
हा हा हा हा
ओके tension नका घेवू मी चव्हाणांचा अविरत ,जन्माने सोलापूरकर पण सवयीने पुणेकर
कारण अहो आमचा जन्मच फक्त सोलापूरचा बाकी आम्ही लहानपणापासून पुण्यातच मोठे झालो आहे.
आमच्या वयाची २३ वर्ष ओलांडली असून सध्या संगणक शास्त्रामध्ये उच्च शिक्षण (P.G) कष्ट आम्ही करत आहोत

दिसायला तसा बरा आहे पण अजून तरी कोणत्या मुलीला आवडलो नाही असे म्हण्यापेक्षा आम्हालाच
कोणी आवडले नाही.
           तसा एक वि
रंगुळा म्हणूनच मी २०१० मध्ये ब्लॉग चालू केला कारण आपल्या आजूबाजूला जे काही चालले
आहे ते कोठेतरी मांडावे अशी एक सुप्त इच्छा होती आणि ती या ब्लॉग मधून पूर्ण झाली.
           मी लिहिलेले तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि हो आवडले तर प्रतीक्रिया दयाला विसरू नका  




हे माझे मलाच माझ्याबद्दल पडलेले काही प्रश्न आणि त्याची माझ्याकडून मिळालेली उत्तरे जसे आठवतील तसे लिहित जातो ........

१) माझ्या आयुष्याचे आयडॉल
  माझे आई बाबा आणि आमचे छत्रपती शिवाजी राजे
२) माझी आई
    हाडाची शिक्षिका पण तरही खूप प्रेमळ कष्टाळू कशाला नाय म्हणत नाय ती आपल्याला
   (लहानपणी गणिते शिकवताना तिने मारलेली पिठाच्या हाताची चापट आज हि लक्षात आहे )
३) माझे स्वप्न
  ते मला फक्त रात्रीच पडते आणि सकाळी बेड वरून उठताच अंघोळी बरोबर वाहून जाते
४) After  ५ years मी कुठे असेल
  पार्किंग ला BMW  लावून स्वताच्या बंगल्यात सुंदर(त्या शिवाय लग्नच करणार नाही ) अश्या बायको बरोबर किचेन मध्ये कामात busy
५) मी कुठे मोठा झालो
  आपल्या पुण्यातच हो म्हणजे सांगावी गावात
६) माझे मित्र
   खूप सारे मित्र आहेत आपल्याला मैत्री करायला  फार आवडते (पण मुलींशी नाही पटत आपले जास्त ) कारण त्या शिवाय जीवन मजेशीर नाही हो .....
७) missing  someone
     हा कभी कभी मेरे दिल मै ख्याल आता हे वो होती तो कैसा होता .........
८) माझे bedrrom
   नेहमी आवरलेले clean आणि माझ्या कॉम्पुटर बरोबर त्याची ती शोभा खूपचं छान दिसते
९)माझे आवडते पुस्तक
  खूप आहेत माझ्याकडे कपाट भरले आहे मी वाचलेल्या पुस्तकांचे आता त्यातून निवडणे खूप अवघड आहे
10) माझे आवडते खाद्य
    खाण्याच्या बाबतीत मी पक्का पुणेकर आहे पण तरही त्यातल्या त्यात  भात वरण, मासे, चिकन चा कुठला हि पदार्थ आपल्याला जाम आवडतो
११) माझा आवडता brand
    wrangler ,levi's & zodiac
१२) माझ्या आवडीची वेळ
   रात्री ११ नंतर
१३) माझा आवडता गायक आणि संगीतकार
  खूप आहेत हो सांगता येणे म्हणजे अवघड आहे कारण संगीत हा आपला खूप वीक point आहे
१४) माझा आवडता नेता
    राज ठाकरे आणि आपले शरद राव (भ्रष्ट असले तरही राजकारणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही )


 


 


July 4, 2011

ज्यांच्या शिवाय हे जीवनच अधुरे आहे ..........................


"समाजाच्या आरोग्यासाठी अविरत झटणारा असा डिप्लोमा Pharmacy ग्रुप ........"कारण त्याशिवाय यांना पैसे कसे मिळणार"

आमचे Pharmacists मंडळ 
Computer Doctor




संगीत वादक निरंजन 












कुणालभाऊ
                   
राहुल बहीरट उर्फ "काका "
                       






अर्धवटराव "हरिप्रसाद "
सांगलीचा रजनीकांत "सुर्यकांत पाटील "

                      
                         
                            




भोसले पाटील
             











लंगोटी मित्र  गिरीशदादा नागाने उर्फ "नागू "


 
                                                                                                                                                                                    

July 1, 2011

कर्माचा सिद्धांत

हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत "हे पुस्तक वाचनात आले अतिशय सुंदर असे हे पुस्तक कर्मा बदल खूप काही सांगून जाते. आपल्या कर्माची फळे आपल्याला कशी भोगावी लागतात ती नियती कडून कशी वसूल केली जातात आणि कोणी किती जरा मोठा असला तरी त्याला शेवटी कर्माचे फळ हे भोगल्या शिवाय सुटका नाही हे या पुस्तकात अगदी समर्पक उदाहरणे देवून पटवून दिले आहे गीतेची उदाहरणे तर फारच सुंदर आहेत . सगळयांनी आवर्जून वाचावे आणि त्या प्रमाणे आपल्या वागण्यात बदल करावा उगाच मिळालेल्या आयुष्याला दोष देत ते घालवण्या पेक्षा चांगले कर्म करून निदान पुढच्या जन्मात तरी चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयतन करावे कारण जे आता आहे ते सगळे मागच्या जन्माचे भोग आहेत मग ते चांगले असो वा वाईट हे ते पुस्तक वाचल्यावर समजते त्यात ते म्हणतात -:
"कर्माची गती खरोखर अति गहन |
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ||
पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती |
माझ्या घरात खायला नाही माती ||
गोकुळात त्याने केल्या अलोकिक लीला |
माझ्या बरोबर गुरूगृही आणितसे समिधा ||
आज तो बसला आहे सिंहासनावर |
माझ्या हाती मात्र चिपळ्या एकतारी || "

January 7, 2011

माझा महाराष्ट्र

गर्जा हा महाराष्ट्र ,रांगडा हा महाराष्ट्र ,
कुशल हा महाराष्ट्र ,लाल मातीतला हा महाराष्ट्र ,
सह्याद्रीच्या कुशीतला महाराष्ट्र ,
'आदर्श' कलंक लागलेला महाराष्ट्र ,
आत्महत्याने ईवळणारा महाराष्ट्र ,

राज्यांचा महाराष्ट्र , जोतिबांचा महाराष्ट्र ,
शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ,
बारामतीकरांनी ने विकलेला महाराष्ट्र ,
धमक असताना बाईची चाकरी करणारा महाराष्ट्र ,

भाषेसाठी लढणारा महाराष्ट्र ,
इतिहास साठी भांडणारा महाराष्ट्र ,
पण शिक्षणापासून वंचित महाराष्ट्र ,
अंधारे भविष्य धाखवणारा महाराष्ट्र ,

पाण्यासाठी नुसतेच भांडणारा महाराष्ट्र ,
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा महाराष्ट्र ,
पण ज्यांनी हि " वाईट सत्कर्मे " केली ,
त्यांच्या पाठीशी सदेव उभा राहणारा
" जय महाराष्ट्र "

( हि कविता आधीचा महाराष्ट्र , आणि आताचा महाराष्ट्र याच्यावर करण्यात आली आहे
तरी त्याचा कोणी गैर अर्थ काढू ने)

...........................अविरत
७/०१/२०११
१:०८ pm

December 8, 2010

मैञिणीचा मित्र

आज काहीसे वेगऴेच झाले
माझे मन जुन्या आठवणीने भरून आले

मग काय पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली
त्या जागेला भेटून यावे असे वाटले

अपसुकच गाडीचे हँनङल तिकड़ वळालं
गाड़ी वरुण उतरताच समोर तिचे दर्शन झाले

मला वाटले देवानेच हे सर्व घडवून अणले
म्हणुन मी मनापसून त्याच आभार मानल

मी तिला पाहिल तिने मला पाहिल
मी पुढे जाणार इतक्यात आमच्या
मधी कोणी तरी अवतरल


तो दूसरा तीसरा कोणी नव्हता
माझ्याच मागच्या बाकावर बसणारा
आमच्याच वर्गातला माझाच मित्र होता

..................अविरत
९/१२/२०१०
११:१८ pm

November 11, 2010

"तुझ्यासाठीचे प्रेम"

तुझ्या आठवणीने आज मन
आभाळा सारखे भरून आले
आणि मनातले प्रेम मात्र डोळ्यातून
पाऊस धारा सारखे बरसू लागले

का सोडून गेलीस मला
हेच मला समजत नाही
प्रेम कोठे कमी पडले माझे
हेच मनाला उमजत नाही

नाही म्हणाले तरी तुझी
आठवण आल्याशिवाय राहत नाही
डोळे किती जरी मिटले तरी
डोळ्यासोमोर तू आल्याशिवाय राहत नाही

दगडाच्या घाव प्रमाणे मनाचे
तुकडे करायला तू विसरली नाही
पण इतके होऊन हि तुला
विसरायला माझे मन अजून हि तयार होत नाही

...................अविरत
२८/०१/२०१०
५:५० pm

October 30, 2010

. प्रार्थना

झोळीचे ना ओझे व्हावे
इतुकेच मज देई देवा
मन शांतीने भरुन राहो
कुणाचाही ना वाटो हेवा

दिवसा वर्षावी तू बा
मजवर उन्हाची माया
रात्री डोके ठेवताच क्षणी
निद्राधीन व्हावी काया

आग वैर अन सुडाची
कधीही नकोच पोटी
गाणे फक्त आनंदाचे
सदोदित यावे ओठी

उरात माझ्या वाहत राहो
नित्य चैतन्याचा झरा
नको मुखवटा चेहर्‍यावरी
जो दिला तू तोच बरा

कोणावरती नको असूया
कोणावरती नको रुसावा
लहान वा मोठा कोणी
चेहरा त्यासी हसावा

मरणाची मज नको भीती
पण जगण्याचा ध्यास हवा
नको मज पांडीत्य वेदांताचे
पण जीवनाचा अभ्यास हवा

मज जगण्याचे सामर्थ्य हवे
कुणावर माझा भार नको
पायवर मी उभे रहावे
कुणाचाही आधार नको

पक्वान्नाचे ताट नको
कष्टाचे पुरे दोन घास
नको ऐशारामी जगणे
कष्टाची मी धरावी कास

........विनायक
(मला हि कविता खूप आवडली म्हणून मी ती इथे मांडतो आहे )

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...