July 1, 2011

कर्माचा सिद्धांत

हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत "हे पुस्तक वाचनात आले अतिशय सुंदर असे हे पुस्तक कर्मा बदल खूप काही सांगून जाते. आपल्या कर्माची फळे आपल्याला कशी भोगावी लागतात ती नियती कडून कशी वसूल केली जातात आणि कोणी किती जरा मोठा असला तरी त्याला शेवटी कर्माचे फळ हे भोगल्या शिवाय सुटका नाही हे या पुस्तकात अगदी समर्पक उदाहरणे देवून पटवून दिले आहे गीतेची उदाहरणे तर फारच सुंदर आहेत . सगळयांनी आवर्जून वाचावे आणि त्या प्रमाणे आपल्या वागण्यात बदल करावा उगाच मिळालेल्या आयुष्याला दोष देत ते घालवण्या पेक्षा चांगले कर्म करून निदान पुढच्या जन्मात तरी चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयतन करावे कारण जे आता आहे ते सगळे मागच्या जन्माचे भोग आहेत मग ते चांगले असो वा वाईट हे ते पुस्तक वाचल्यावर समजते त्यात ते म्हणतात -:
"कर्माची गती खरोखर अति गहन |
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ||
पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती |
माझ्या घरात खायला नाही माती ||
गोकुळात त्याने केल्या अलोकिक लीला |
माझ्या बरोबर गुरूगृही आणितसे समिधा ||
आज तो बसला आहे सिंहासनावर |
माझ्या हाती मात्र चिपळ्या एकतारी || "

No comments:

Post a Comment

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...