June 25, 2010

माझे आयुष्य

आयुष्याचा अर्थ काही अजूनपर्यंत उमगला नाही
शाळेत असताना अभ्यास काही कळला नाही
सरांच्या शिव्या खावून शाळा सारी संपून गेली
लहानपणाची मजा सारी तिकडेच निघून गेली

शाळेनंतर कॉलेजचे रंगारंग जीवन सुरु झालं
पोरी पाहण्यामधेच सगळे वर्ष निघून गेलं
खूप मोठे कोणीतरी व्हावे असे नुसते वाटत राहिले
ते राहिले बाजूला पण जे आहे तेच टिकवणे अवघड झाले

नोकरी साठी मग कॅम्पस देणे आले
पण मार्क कमी म्हणून त्यांनी पण हाकलून दिले
आमचे सारे मित्र select झाले
पण आम्ही मात्र fail झालो

तेव्हा आयुष्याचे एक गुपित कळले
कोणी कोणाच नसतं आणि स्वताचे
आयुष्य स्वतालाच जगायचं असतं

................अविरत
२५/०६/२०१०
११:४० pm

June 24, 2010

धारावी झोपडपट्टी   

सहजच कामानिमित मुंबईला जाणे झाले,तसे मुंबई माझ्यासाठी काही नवी नाही अनेक वेळा जाणे-येणे होत असते पण या वेळेस पहिल्यांदाच मुंबईला पावसाळ्यात जाणे झाले. आज पर्यंत जे काही ऐकले होते किंवा टि.व्ही . वर पाहिले होते ते एकदम प्रत्येक्ष पाहिला मिळाले. वरून पडणारा पाऊस ,रस्त्यावरून वाहणारे पाणी ,वाहनांच्या रांगा आणि त्यातून वाट काडणारी मुंबईकर मंडळी.
त्याच वेळेस धारावी च्या काही झोपड्यामध्ये जाणे झाले आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जिचा नावलौकिक आहे चित्रपटात पाहिलीली, पेपर मध्ये वाचलीली धारावी झोपडपट्टी आज इतकी जवळून पाहत होतो. पाऊस पडताच साऱ्या जगाला आनंद होतो, पाऊसात फिरयाला जाण्याचे प्लान आखले जातात, प्रेम गीते सुचतात हा आज पर्यंतचा माझा अनुभव होता. पण इकडे परिस्तिथी जरा वेगळीच होती........
पाउस पडायला लागला की यांचे मन चिंताक्रांत होते,घरात येणाऱ्या पाण्याला कसे अड़ावयाचे याचे प्लानिंग सुरु होते,जमवलेला संसार कुठे ठेवायचा याने विचारांचे काहुर माजते,जेवणाची चुल देखिल बंद होते आणि जो पाउस जगाच्या डोळ्यात आनंद आणतो तोच यांच्या डोळ्यात मात्र पानी आणतो. सारया जगाची घाण वाहून नेणाऱ्या गटारीचे पानी घरात आल्यावर सुधा धीर खचू न देता तसल्या घाणित सुधा  रात्र काड़ाने म्हणजे खरच दिव्य म्हणावे लागेल. फास्ट ट्रैक वर धावणारी जिंदगी मात्र इकडे आली कि स्लो ट्रैक वर येते. तरी पण इथली लोके कोठल्याही प्रकारची तक्रार न करता जीवनाकडे एक वेगळ्याच नजरेने बघतात हे लक्षात आले तिकडे एका बरोबर बोलने झाले त्यावेळेस तो म्हणाला कि 
"सहाब कटिंग पिते समय अर्धा ग्लास खाली हे  ये हम कभी नहीं सोचते, 
जो भरा हे उतना हि आपणा हे " 
या विचाराने मला आयुष्याचे  एक सूत्रच दिले आणि मग मुंबई ची कहाणी समजली इथला प्रत्येक माणूस याच सूत्रावर जगतो आणि म्हणून तो कोणत्या पण संकटाला सामोरे जायला तयार असतो.

June 23, 2010

पाऊस वयातला

पाऊस लहानपणीच
मनसोक्त भिजण्याचा
शाळेला दांडी मारण्याचा
होडी करुन सोडण्याचा
आईचा धपाटा खाण्याचा

पाऊस तरुणाईतला
गाडीवर तिला घेवून फिरण्याचा
तिच्याबरोबर चिंब भिजण्याचा
एकाच ग्लासात गरम चहा पिण्याचा

पाऊस चाळीसीतला
हातात पुस्तक धरून
जुनी गीते ऐकण्याचा
बायकोच्या हातची भजी खात
जुन्या आठवणीला उजाळा देण्याचा

पाऊस म्हातारपणीचा
आराम खुर्चीवर बसून
स्वेटरची उब सोसण्याचा
आणि आभाळा कडे पाहताच
यमाची आठवण करून देणारा .....

...............अविरत
२३/०६/२०१०
११:५८ pm


June 17, 2010

एक बार

एक बार वळून पाहिलेस,
होश हरपले बेहोश मी
एक बार वळून नजर मिळवलिस,
नजरेत तूझ्या फ़क्त मी
एक बार वळून भेटलो पुन्हा,
गुलाबी क्षनात तू अन् मी
एकदा पुन्हा स्वप्न माझं तुट्लं,
हरवलिस कोठेतरी
आणि शोधतोय मी

June 13, 2010

पहिला पाऊस

पहिला पाऊस
पहिली सर
प्रेमाची नशा
चढली अंगभर

पहिला पाऊस
पहिली सर
तिच्या मिठीची
आली आठवण

पहिला पाऊस
पहिली सर
तिच्या बरोबरच्या
चहाची चव आली तोंडावर

पहिला पाऊस
पहिली सर
आली पहिल्या
प्रेमाची आठवण

.........अविरत
१३/०६/२०१०
११:२७ pm

प्रश्न के साथ रहो

"मेरे जीवन का क्या उद्देश्य है?" यह एक प्रश्न हमारे system में, हमारी आत्मा में मानवीय मौल्यों को प्रकाशित करता है. परन्तु इस प्रश्न के उत्तर को पाने में जल्दी मत करो. प्रश्न के साथ रहो. प्रश्न अपने में एक औजार है जिसके सहारे तुम अपने अन्दर की गहरी में उतर सकते हो.

तु नसताना ................

तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्षा तुझ्या,
नसण्यातच माझं जास्त जगन होतं

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...