धारावी झोपडपट्टी
सहजच कामानिमित मुंबईला जाणे झाले,तसे मुंबई माझ्यासाठी काही नवी नाही अनेक वेळा जाणे-येणे होत असते पण या वेळेस पहिल्यांदाच मुंबईला पावसाळ्यात जाणे झाले. आज पर्यंत जे काही ऐकले होते किंवा टि.व्ही . वर पाहिले होते ते एकदम प्रत्येक्ष पाहिला मिळाले. वरून पडणारा पाऊस ,रस्त्यावरून वाहणारे पाणी ,वाहनांच्या रांगा आणि त्यातून वाट काडणारी मुंबईकर मंडळी.
त्याच वेळेस धारावी च्या काही झोपड्यामध्ये जाणे झाले आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जिचा नावलौकिक आहे चित्रपटात पाहिलीली, पेपर मध्ये वाचलीली धारावी झोपडपट्टी आज इतकी जवळून पाहत होतो. पाऊस पडताच साऱ्या जगाला आनंद होतो, पाऊसात फिरयाला जाण्याचे प्लान आखले जातात, प्रेम गीते सुचतात हा आज पर्यंतचा माझा अनुभव होता. पण इकडे परिस्तिथी जरा वेगळीच होती........
पाउस पडायला लागला की यांचे मन चिंताक्रांत होते,घरात येणाऱ्या पाण्याला कसे अड़ावयाचे याचे प्लानिंग सुरु होते,जमवलेला संसार कुठे ठेवायचा याने विचारांचे काहुर माजते,जेवणाची चुल देखिल बंद होते आणि जो पाउस जगाच्या डोळ्यात आनंद आणतो तोच यांच्या डोळ्यात मात्र पानी आणतो. सारया जगाची घाण वाहून नेणाऱ्या गटारीचे पानी घरात आल्यावर सुधा धीर खचू न देता तसल्या घाणित सुधा रात्र काड़ाने म्हणजे खरच दिव्य म्हणावे लागेल. फास्ट ट्रैक वर धावणारी जिंदगी मात्र इकडे आली कि स्लो ट्रैक वर येते. तरी पण इथली लोके कोठल्याही प्रकारची तक्रार न करता जीवनाकडे एक वेगळ्याच नजरेने बघतात हे लक्षात आले तिकडे एका बरोबर बोलने झाले त्यावेळेस तो म्हणाला कि
"सहाब कटिंग पिते समय अर्धा ग्लास खाली हे ये हम कभी नहीं सोचते,
जो भरा हे उतना हि आपणा हे "
या विचाराने मला आयुष्याचे एक सूत्रच दिले आणि मग मुंबई ची कहाणी समजली इथला प्रत्येक माणूस याच सूत्रावर जगतो आणि म्हणून तो कोणत्या पण संकटाला सामोरे जायला तयार असतो.
No comments:
Post a Comment