शाळेत असताना अभ्यास काही कळला नाही
सरांच्या शिव्या खावून शाळा सारी संपून गेली
लहानपणाची मजा सारी तिकडेच निघून गेली
शाळेनंतर कॉलेजचे रंगारंग जीवन सुरु झालं
पोरी पाहण्यामधेच सगळे वर्ष निघून गेलं
खूप मोठे कोणीतरी व्हावे असे नुसते वाटत राहिले
ते राहिले बाजूला पण जे आहे तेच टिकवणे अवघड झाले
नोकरी साठी मग कॅम्पस देणे आले
पण मार्क कमी म्हणून त्यांनी पण हाकलून दिले
आमचे सारे मित्र select झाले
पण आम्ही मात्र fail झालो
तेव्हा आयुष्याचे एक गुपित कळले
कोणी कोणाच नसतं आणि स्वताचे
आयुष्य स्वतालाच जगायचं असतं
................अविरत
२५/०६/२०१०
११:४० pm
