डोळ्यासोमोर घरातले चिरडले गेल्याचा
हा थरारच बुद्धी सुन्न करून गेला
छोट्या बहिणीचा आवाज ऐकून
माझा जीवच निघून गेला
कोणाला वाचवू हेच मनाला समजेना
हे समजे पर्यंत तर दोन छोट्यांचा
जीवच देव घेवून गेला
डोळ्यात पाणी होते
आणि पायात अवसान नव्हते
कोणीतरी मदतीला यावे इतकेच
सरळ सोपे गणित होते
पण लोकांचे मन दगडा प्रमाणे होते
उभे राहून पाहण्यामधेच लोक सारे दंग होते
त्यांचे हे रूप पाहून माणुसकी संपल्याचे जाणवले
मग स्वताच शेवटी घरच्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले
जिवंत असणाऱ्यांना मग दवाखान्यात
नेण्यामधेच सारे गुंतले
आणि त्या दोन चिमुकल्यांचे देह
मात्र गाडी मधेच गुंतले
आज हि आठवण आली तर
डोळ्यात पाणी उभे राहते
पण राहिलेल्या मुलांच्या पदरी
तरी आई -बापाचे जीवदान टाकले
याचेच खूप धन्य वाटते
..............................
०७/ ०१/ २०१०
११:०५ pm
No comments:
Post a Comment