April 24, 2010

माझ्या घरच्यांचा अपघात

आयुष्यात पहिलाच अपघात पहिला
डोळ्यासोमोर घरातले चिरडले गेल्याचा
हा थरारच बुद्धी सुन्न करून गेला

छोट्या बहिणीचा आवाज ऐकून
माझा जीवच निघून गेला
कोणाला वाचवू हेच मनाला समजेना
हे समजे पर्यंत तर दोन छोट्यांचा
जीवच देव घेवून गेला

डोळ्यात पाणी होते
आणि पायात अवसान नव्हते
कोणीतरी मदतीला यावे इतकेच
सरळ सोपे गणित होते

पण लोकांचे मन दगडा प्रमाणे होते
उभे राहून पाहण्यामधेच लोक सारे दंग होते
त्यांचे हे रूप पाहून माणुसकी संपल्याचे जाणवले
मग स्वताच शेवटी घरच्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले

जिवंत असणाऱ्यांना मग दवाखान्यात
नेण्यामधेच सारे गुंतले
आणि त्या दोन चिमुकल्यांचे देह
मात्र गाडी मधेच गुंतले

आज हि आठवण आली तर
डोळ्यात पाणी उभे राहते
पण राहिलेल्या मुलांच्या पदरी
तरी आई -बापाचे जीवदान टाकले
याचेच खूप धन्य वाटते

..............................
...............अविरत
०७/ ०१/ २०१०
११:०५ pm

No comments:

Post a Comment

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...