बाप माझा पुण्यात आला
आणि या साऱ्या माणसांच्या
गर्दतीत तो पण सामील झाला
राहायला जागा नाही म्हणून
रोज एक स्टेशन फिरू लागला
पोलीस रोज मारतात म्हणून
रोज वेगळा बेंच पकडू लागला
ओले कपडे घालूनच रात्री
तो झोपू लागला कारण
एक जोडी शिवाय दुसरी
जोडच नव्हती अंगावर घालयला
बस ला पैसे जास्त लागतात
म्हणून २०कि.मी . सायकल
लागला चालवयाला आणि
पायाला गोळे येतात म्हणून
सुतळी बांधे पायाला
पैसे नव्हते जेवयाला मग
पाणी आणि पाव लागला खायला
भूक नाही भागली म्हणून
महारोग्याच्या लाईनित लागला खायला
आज पण नशिबाची साथ नाही
तरी पण बाप माझा लढतो आहे
जगातल्या प्रत्येक सुखाची
किंमत माझ्यासाठी मोजतो आहे
बापा बदल लिहताना पाणी माझ्या डोळ्यात आले
सारे कसे सुन्न झाले आणि बापाच्या प्रत्येक
कष्टाचे चांगले फळ माझ्या नशिबी आलं................
..............................
०८/०१/२०१०
१०:५४ pm
No comments:
Post a Comment