January 7, 2011

माझा महाराष्ट्र

गर्जा हा महाराष्ट्र ,रांगडा हा महाराष्ट्र ,
कुशल हा महाराष्ट्र ,लाल मातीतला हा महाराष्ट्र ,
सह्याद्रीच्या कुशीतला महाराष्ट्र ,
'आदर्श' कलंक लागलेला महाराष्ट्र ,
आत्महत्याने ईवळणारा महाराष्ट्र ,

राज्यांचा महाराष्ट्र , जोतिबांचा महाराष्ट्र ,
शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ,
बारामतीकरांनी ने विकलेला महाराष्ट्र ,
धमक असताना बाईची चाकरी करणारा महाराष्ट्र ,

भाषेसाठी लढणारा महाराष्ट्र ,
इतिहास साठी भांडणारा महाराष्ट्र ,
पण शिक्षणापासून वंचित महाराष्ट्र ,
अंधारे भविष्य धाखवणारा महाराष्ट्र ,

पाण्यासाठी नुसतेच भांडणारा महाराष्ट्र ,
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा महाराष्ट्र ,
पण ज्यांनी हि " वाईट सत्कर्मे " केली ,
त्यांच्या पाठीशी सदेव उभा राहणारा
" जय महाराष्ट्र "

( हि कविता आधीचा महाराष्ट्र , आणि आताचा महाराष्ट्र याच्यावर करण्यात आली आहे
तरी त्याचा कोणी गैर अर्थ काढू ने)

...........................अविरत
७/०१/२०११
१:०८ pm

December 8, 2010

मैञिणीचा मित्र

आज काहीसे वेगऴेच झाले
माझे मन जुन्या आठवणीने भरून आले

मग काय पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली
त्या जागेला भेटून यावे असे वाटले

अपसुकच गाडीचे हँनङल तिकड़ वळालं
गाड़ी वरुण उतरताच समोर तिचे दर्शन झाले

मला वाटले देवानेच हे सर्व घडवून अणले
म्हणुन मी मनापसून त्याच आभार मानल

मी तिला पाहिल तिने मला पाहिल
मी पुढे जाणार इतक्यात आमच्या
मधी कोणी तरी अवतरल


तो दूसरा तीसरा कोणी नव्हता
माझ्याच मागच्या बाकावर बसणारा
आमच्याच वर्गातला माझाच मित्र होता

..................अविरत
९/१२/२०१०
११:१८ pm

November 11, 2010

"तुझ्यासाठीचे प्रेम"

तुझ्या आठवणीने आज मन
आभाळा सारखे भरून आले
आणि मनातले प्रेम मात्र डोळ्यातून
पाऊस धारा सारखे बरसू लागले

का सोडून गेलीस मला
हेच मला समजत नाही
प्रेम कोठे कमी पडले माझे
हेच मनाला उमजत नाही

नाही म्हणाले तरी तुझी
आठवण आल्याशिवाय राहत नाही
डोळे किती जरी मिटले तरी
डोळ्यासोमोर तू आल्याशिवाय राहत नाही

दगडाच्या घाव प्रमाणे मनाचे
तुकडे करायला तू विसरली नाही
पण इतके होऊन हि तुला
विसरायला माझे मन अजून हि तयार होत नाही

...................अविरत
२८/०१/२०१०
५:५० pm

October 30, 2010

. प्रार्थना

झोळीचे ना ओझे व्हावे
इतुकेच मज देई देवा
मन शांतीने भरुन राहो
कुणाचाही ना वाटो हेवा

दिवसा वर्षावी तू बा
मजवर उन्हाची माया
रात्री डोके ठेवताच क्षणी
निद्राधीन व्हावी काया

आग वैर अन सुडाची
कधीही नकोच पोटी
गाणे फक्त आनंदाचे
सदोदित यावे ओठी

उरात माझ्या वाहत राहो
नित्य चैतन्याचा झरा
नको मुखवटा चेहर्‍यावरी
जो दिला तू तोच बरा

कोणावरती नको असूया
कोणावरती नको रुसावा
लहान वा मोठा कोणी
चेहरा त्यासी हसावा

मरणाची मज नको भीती
पण जगण्याचा ध्यास हवा
नको मज पांडीत्य वेदांताचे
पण जीवनाचा अभ्यास हवा

मज जगण्याचे सामर्थ्य हवे
कुणावर माझा भार नको
पायवर मी उभे रहावे
कुणाचाही आधार नको

पक्वान्नाचे ताट नको
कष्टाचे पुरे दोन घास
नको ऐशारामी जगणे
कष्टाची मी धरावी कास

........विनायक
(मला हि कविता खूप आवडली म्हणून मी ती इथे मांडतो आहे )

October 20, 2010

अचानक बरसणाऱ्या पावसाचं

अचानक बरसणाऱ्या पावसाचं
देखील स्वागतच असतं.
अणू-रेणू सुखावणाऱ्या अमृताचं
कौतूक धरतीला उमगतं.

हातचं राखून ठेवणाऱ्याला
काहीच मिळत नसतं.
तोलून मापून चालणाऱ्या
सुख हुलकावण्या देत रहातं.

खऱ्या प्रेमात काही द्यायचंही नसतं
काही घ्यायचं ही नसतं.
क्षणभर मिठीत विसावायचं असतं
क्षणभर सत्य विसरायचं असतं

October 13, 2010

What is love?

What is love?

Love is when my mom
comes to me at night and say
“beta I love u ……“

Love is when I come back
from Work and papa says
“beta ,late hone wala tha to call kar deta…..?

Love is when my bhabihi says,
“oye hero,ladki-wadki patai ki nahi ….?”

Love is when my sister says
“Bhai, meri shadi ke baad mujase
Jhagade kaun karega .?”

Love is when I m moodless
And my brother Says ,
“chal kahi ghumane chalte hay “

Love is when my best friends call me and says ,
“kamine ….!tere bina dil nahi lagata”

That’s love don’t miss in life
Love is not only having GF or BF
Dis love is better than having GF or BF

September 6, 2010

अधुरे प्रेमपत्र .....

वळणा मागून वळण मागे पडत राहतात
कोठेच नसते ती पण नजरा तिला शोधत राहतात

अशीच एकदा कॅन्टीन मध्ये दिसली असता
हजारोंना सोडून नजरेला तिच्या नजर भिडली असता

काय वाटेल तिला, राग येईल का तिला असे प्रश्न पडले असता
आणि दिवसा मागून दिवस त्या वळणावरच मळून गेले असता

कधीच समजले नाही तिला मला काय म्हण्याचे आहे
मग वाटले समोरा-समोर बोलणे नाही निदान पत्रातून तरी सांगावे

पण वाटले तिला नाही आवडले तर .............
मग वाटले जावू दे तिच्या कोमल हातामध्ये देण्याचे तरी नशिबी यावे

खूप प्रयतन करून त्या रात्री पत्र लिहिले होते
पहिल्यापसून शेवट पर्यंत १०० वेळा वाचले होते

शब्दांत न उतरणाऱ्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयतन करत होतो
आणि लिहिता लिहिता तिला माझ्या मिठी मध्ये बघत होतो

दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही,
उद्या येईल म्हणून ती रात्र काही सरलीच नाही

दुसऱ्या दिवशी तिची मैञीण येताना दिसली
मला पाहून जरा दूरवरच थांबली .......

हातातली चिठ्ठी पाहून म्हणाली द्याला फारच उशीर केला रे
आता ती आपल्या सारण्याच कायमची सोडून गेली

...................अविरत
०६/०९/२०१०
११:१९ pm

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...