May 15, 2010

आज महाराजांबद्दल लिहण्यास कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र दिन साजरा झाला ज्या महाराष्ट्राला घडवण्यात मोठा वाटा असणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले.पण आज त्याची आठवण किती जणांना आहे याचीच शंका येते प्रत्येक जण नुसते त्यांचे नाव स्वतच्या स्वार्थासाठी  वापरतो आहे .मग कोणी राजकारणासाठी तर कोणी स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी .आज प्रत्येक जण उठतो आहे आणि आपल्या सवडी प्रमाणे त्यांची जयंतीसाजरी करतो आहे आणि मग त्यातून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या मिरवणुका, अनेक कार्यक्रम, अनेक शिबीरे आणि मग त्याच्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्यावर सगळ्यांचा भर.पण महाराजांबद्दल आस्था असणारे फार थोडे लोक आढळतात कि ज्यांना काहीना काही करण्याची उर्मी असते पण त्यांचे ऐकणारे कोणी नसते . मला तर एक काळात नाही हे अश्या प्रकारे सिनेमाची गाणी लावून दारू पिवून नाचले म्हणजे अभिमान दाखावाल्यासारखे होते का ? आज किती जण असे आहेत कि जे खरेच या विचारांनी प्रेरित आहेत. स्त्रीबदल आदर , मातृभूमीबदल प्रेम, प्रत्येक धर्माबद्दल आदर याची तर कोणाला काडी मात्र जाणीव नाही. धर्मवीर संभाजी महाराजांची  जयंती देखील नुकतीच साजरी झाली त्या वेळेस एक मिरवणूक पहिली तर त्या मिरवणुकीत "सात समुंदर पार मे तेरे पिचे पिचे" हे गाणे ऐकले आणि अंगावर काटाच उभा राहिला नेमकी मिरवणूक कशाची हा प्रश्न उभा राहिला ?
जयंती असते कशासाठी हेच ९०% लोकांना माहित नाही. होऊन गेलेल्या थोर लोकांचे स्मरण राहण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत या गोष्ट पोहोचण्यासाठी, त्या लोकांचे विचारांचे स्मरण आणि आचरण करण्यासाठी जयंती साजरी करावी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून आदर्श समाज घडवावा हि एक साधी अपेक्षा 


No comments:

Post a Comment

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...