September 6, 2010

अधुरे प्रेमपत्र .....

वळणा मागून वळण मागे पडत राहतात
कोठेच नसते ती पण नजरा तिला शोधत राहतात

अशीच एकदा कॅन्टीन मध्ये दिसली असता
हजारोंना सोडून नजरेला तिच्या नजर भिडली असता

काय वाटेल तिला, राग येईल का तिला असे प्रश्न पडले असता
आणि दिवसा मागून दिवस त्या वळणावरच मळून गेले असता

कधीच समजले नाही तिला मला काय म्हण्याचे आहे
मग वाटले समोरा-समोर बोलणे नाही निदान पत्रातून तरी सांगावे

पण वाटले तिला नाही आवडले तर .............
मग वाटले जावू दे तिच्या कोमल हातामध्ये देण्याचे तरी नशिबी यावे

खूप प्रयतन करून त्या रात्री पत्र लिहिले होते
पहिल्यापसून शेवट पर्यंत १०० वेळा वाचले होते

शब्दांत न उतरणाऱ्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयतन करत होतो
आणि लिहिता लिहिता तिला माझ्या मिठी मध्ये बघत होतो

दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही,
उद्या येईल म्हणून ती रात्र काही सरलीच नाही

दुसऱ्या दिवशी तिची मैञीण येताना दिसली
मला पाहून जरा दूरवरच थांबली .......

हातातली चिठ्ठी पाहून म्हणाली द्याला फारच उशीर केला रे
आता ती आपल्या सारण्याच कायमची सोडून गेली

...................अविरत
०६/०९/२०१०
११:१९ pm

आजकालची fashion

comfortable नसता तर आखूड
कपडे घालताच कशाला नंतर
उगाच त्याला खाली वर वडून
त्याची size वाढवता कशाला

जितकी कमी कपड्याची size
तितकी त्याची किमत जास्त आहे
किमत कपड्याची देतात कि
अंगप्रदर्शनाची हे मात्र त्यांची
त्यांनाच माहित आहे

साडी डे साजरा केला म्हणजे
संस्कृती जोपसली जाते असे नाही
पण jeans T -shirt मध्ये पण साडी
चा आदर असणे म्हणजे संस्कृती
कळली हे मात्र नक्की आहे

globalization च्या नावाखाली
काही पण विचित्र वागू नका
आज तुम्ही कपडे घालून तरी
फिरता आहात उद्याची पिडी
तशीच फिरली तर आदिमानवाचे
globalization झाले असे काही
म्हणून नका

(हि कविता कोणच्या भावना दुखावण्यासाठी लिहिली नाही तरी ती वाचून त्याचा
आशय समजून घ्यावा हि विनंती )

...........................................................अविरत
२४/०२/२०१०
१०:०७ am

July 19, 2010

प्रेम इतके अवघड का असत

प्रेम इतके अवघड का असत
समजायला आणि उमजायला
इतकं जड जड का असत

असं काय असते त्यात कि
तिला पाहताच मनामध्ये
विचारांच काहूर माजत

चार दोन भेटीमध्येच
तिच्या आणि आपल्या
आयुष्याचा स्वप्न रंगवल जातं

मग पुन्हा फक्त डोळ्या
डोळ्यानीच बोलणं होता
मना-मानतच सारं जुळून जातं

एके दिवशी आपली जागा
दुसरच कोणीतरी घेता
आणि प्रेम सारं हृदयातच विरून जातं

म्हणूनच प्रेम हे अवघड असत
झालं तर सोप असत आणि
ठरवून केलं तर अवघड असत

...................अविरत
१९/०७/२०१०
१०:४८ pm

July 12, 2010

मी तूझा कोण आहे?

सगळीच नाती जगाच्या
नजरेतून पहायची नसतात
मग त्यात आपलं असं
काहीच उरत नाही

तुझं नी माझं नातं
ही असंच आहे
स्नेहाच्या नाजूक
धाग्यात गुंफ़लेलं

या नात्याला तू
नावात गुंतवू नकोस
कारण इथंवरच
नाती संपत नसतात

मी तूझा कोण आहे?
या प्रश्नाला जरी
उत्तर नसलं तरी
तू माझी आहेस
इतकंच पुरेसं नाही का?

July 9, 2010

कधीतरी वाटतं यार,

कधातरी वाटते यार
या खांद्यावर डोके
ठेवून कोणीतरी रडावं
कॉलेज संपल्यावर पण
कोणीतरी आपल्यासाठी थांबावं

ज्या स्वप्नांमधे माझ्या
साऱ्या रात्री जागतात
त्याच स्वप्नात हरवून
तिला देखील जगावंसं वाटावं

माझे असू पुसून तिने
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!

छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं पण,
भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं


July 8, 2010

स्पर्श

तुझ्यासाठी पाऊस पडतो
हा होऊनी बेभान
स्पर्श करतो तुला
वारा हरवूनी भान

ओघळणारे थेंब गालावरती
प्रयत्न् करती थांबण्याचा
अस्तित्व विसरुनी स्वताचे
प्रयतन करती मोती बनण्याचा

मलाही वारा होऊनी तुला
स्पर्श करावा असं वाटतं
थेंब बनुनी पावसाचा
तुझ्या गालावरती थांबावसं वाटत

..............अविरत
08/07/2010
11:30pm

June 25, 2010

माझे आयुष्य

आयुष्याचा अर्थ काही अजूनपर्यंत उमगला नाही
शाळेत असताना अभ्यास काही कळला नाही
सरांच्या शिव्या खावून शाळा सारी संपून गेली
लहानपणाची मजा सारी तिकडेच निघून गेली

शाळेनंतर कॉलेजचे रंगारंग जीवन सुरु झालं
पोरी पाहण्यामधेच सगळे वर्ष निघून गेलं
खूप मोठे कोणीतरी व्हावे असे नुसते वाटत राहिले
ते राहिले बाजूला पण जे आहे तेच टिकवणे अवघड झाले

नोकरी साठी मग कॅम्पस देणे आले
पण मार्क कमी म्हणून त्यांनी पण हाकलून दिले
आमचे सारे मित्र select झाले
पण आम्ही मात्र fail झालो

तेव्हा आयुष्याचे एक गुपित कळले
कोणी कोणाच नसतं आणि स्वताचे
आयुष्य स्वतालाच जगायचं असतं

................अविरत
२५/०६/२०१०
११:४० pm

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...