मन काही भरत नाही
नाही म्हटले तरी तुझा
स्पर्श आठवल्या शिवाय
राहत नाही
उगाच का तुझ्या आठवणीत
झुरतो आहे मी
तू तिकडे सुखात असताना
इकडे उगाच का रडतो आहे मी
तुझ्या एका मिठीची आठवण
आज हि आहे मला
कधी तरी येशील आणि पुन्हा
मिठीत घेशील इतकीच आस आहे मला
तुझ्या ओठाचा स्पर्श आज हि
उमगत नाही आहे मला
तो विषाचा पेला होता कि
अमृताचा हेच अजून
समजत नाही आहे मला
येणा प्रिये तुझ्या वाचून जीव
माझा अधुरा आहे
त्याच्या प्रेम पेक्षा पण
माझ्या प्रेमात तुझा
सुखाचा संसार आहे
..............................
१९/०१/२०१०
११:३४ pm
No comments:
Post a Comment